vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

            मुंबई, प्रतिनिधी: आरे परिसर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. तसेच आरे परिसरातील कुटुंबांना बजावण्यात आलेल्या निष्कासनाच्या नोटीसबाबतचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला जोगेश्वरी (पूर्व) येथील आमदार अनंत (बाळा) नर, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, आदिवासी पाड्यांवरील कोणत्याही कुटुंबाचे हक्क बाधित न होता कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ४३ आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांवर नवीन नागरी सुविधा देण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, अतिक्रमित क्षेत्रातील विद्यमान नागरी सुविधांच्या दुरुस्तीस शासनाने परवानगी दिली आहे. पाड्यांवरील आदिवासी बांधवांना नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागाने उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

शांतीदूत : निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज

८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड…

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष लेख -:-पंचवीस शाळांच्या माध्यमातून मुलांचे ग्रंथालय: विशेष उपक्रम…

वक्फ वाचवा’ परिषद जालन्यात आज शनिवार*वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात इस्लामी विद्वानांचा आवाज*

अहमदनगर चौंडी येथे धनगर समाजाचे 21 दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन…

vishwatmaklokswamivarta