राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा..
मुंबई प्रतिनिधी-राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे २५३ तालुके आणि २९ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपये, तर दुभत्या जनावरांसाठी ३७,५०० रुपये इतकी मदत दिली जाईल. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरं, आणि मनरेगा मार्फत रोजगार देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्याची संधी मिळणार असून राज्य सरकारनं “कोणीही वंचित राहणार नाही” याची ग्वाही दिली आहे.