vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

            मुंबई, प्रतिनिधी: आरे परिसर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. तसेच आरे परिसरातील कुटुंबांना बजावण्यात आलेल्या निष्कासनाच्या नोटीसबाबतचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला जोगेश्वरी (पूर्व) येथील आमदार अनंत (बाळा) नर, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, आदिवासी पाड्यांवरील कोणत्याही कुटुंबाचे हक्क बाधित न होता कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ४३ आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांवर नवीन नागरी सुविधा देण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, अतिक्रमित क्षेत्रातील विद्यमान नागरी सुविधांच्या दुरुस्तीस शासनाने परवानगी दिली आहे. पाड्यांवरील आदिवासी बांधवांना नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागाने उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

मुंबईतील सिद्धार्थनगर, चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी,दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

विधानसभा निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग कल्याणासाठी यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करावे-दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू

vishwatmaklokswamivarta

शासकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामदतीने सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार   

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम