vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

 

राज्य प्रतिनिधी ‘वडीगोद्रीअतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.अनेक कुटुंबे अडचणीत सापडली असून,त्यांच्या जगण्यावर संकट ओढवले आहे.या संकटाच्या काळात शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.

शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्यावतीने निराधार,वंचित आणि आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये किराणा साहित्य गव्हाचे पीठ,तांदू, हळद,मिरची पावडर,साखर,चहा पावडर,शेंगदाणे,डाळी,बिस्कीट,चिवडा यासह आवश्यक साहित्य यांचा समावेश होता.या मदतीमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आर. व्ही. छल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.संस्थेचे कार्यकर्ते व स्थानिक युवकांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष भेट देत मदत पोहोचवली.या प्रसंगी अध्यक्ष आर व्ही. छल्लारे म्हणाले की,“सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहणे हीच खरी सेवा आहे.प्रत्येक सक्षम नागरिकाने आपल्या परीने अशा आपत्तीच्या काळात हातभार लावून मदत केली आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

जनगणना 2027′ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.