vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

     अमरावती, प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये 2017 पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (NTCP) मोठे यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल 5 हजार 700 लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

    या कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल 846 शाळांमध्ये 1 लाख 48 हजार 558 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि तालुका स्तरावर एकूण 14 समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत, जिथे सन 2017 पासून आजपावेतो 90 हजार 328 लोकांना समुपदेशन करण्यात आले.

    यासोबतच, कोटपा कायदा 2003 ची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे . सन 2017 पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3 हजार 664 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून 5 लाख 84 हजार 416 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाने 2018 पासून अवैध तंबाखूवर 212 कारवाया करत 5 कोटी 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे.

      या यशासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पोलीस, शिक्षण व अन्न व औषध विभागाच्या समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

vishwatmaklokswamivarta

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta