vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी):- बालगृहातील मुलांना सुरक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम भविष्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात,” असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या शासकीय मुलांचे बालगृह तथा निरीक्षण गृहास भेट दिली. यावेळी बालगृह तथा निरीक्षण गृहाचे अधिक्षक धनाजी खुपकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बालगृहांची पाहणी करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पोषण, तांत्रिक सुविधा आणि मानसिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळावे,तसेच येथील मुलांना वाचन-साहित्य, संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच मुलांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे व्हाव्यात, पोषण आहारात कोणतीही तडजोड होऊ नये, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत असावी याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. बालगृहातील मुलांसाठी समुपदेशन, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर त्यांनी भर द्यावा, बालगृह तथा निरीक्षण गृहाचे सुरू असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे सदरील बांधकामाचा दर्जा चांगला असावा असे निर्देश त्यांनी दिले. सदरील बालगृहात 14 व निरीक्षण गृहात 1 असे एकूण 15 विद्यार्थी आहेत. यावेळी येथील मुलांनी जिल्हाधिकारी यांना गीत गाऊन दाखवले तसेच जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

 -*-*-*-*-

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे 

vishwatmaklokswamivarta

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta