vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांसाठी आज मतदान पार पडेल.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. या मतदानासाठी 17 हजार 367 कंट्रोल युनिट आणि 34 हजार 734 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन निवडणूक आयोग तसेच राज्य सरकारने केले आहे
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. (Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025) संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट; तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल, संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.

संबंधित पोस्ट

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन….

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश – महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत- नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी- गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती