vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

ठाणे प्रतिनिधी: लग्न ही केवळ सामाजिक परंपरा नसून दोन व्यक्तींच्या आयुष्याला दिशा देणारी आहे. या जाणिवेतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांच्या वतीने ‘ जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर शिवाजी टेक्निकल स्कूल, पंतनगर, घाटकोपर येथे संवादशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हम्हणून,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव विजय परब,आरती नाईक, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत तसेच घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा यांची प्रमुख उपस्थित होते .

हा उपक्रम जरी लग्नाळू तरुण-तरुणींसाठी उपयुक्त वाटत असला, तरी तो केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता लग्न या विषयाशी निगडित असलेल्या विवाहित जोडपी तसेच पालकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला. बदलत्या सामाजिक परिस्थितीत लग्नसंस्थेचे बदलते आयाम, नात्यांमधील अपेक्षा व वास्तव यांचा समतोल कसा साधावा, यावर या संवादशाळेत मोकळा व सखोल संवाद घडवण्यात आला.

पारंपरिक व्याख्यानांच्या चौकटीत न अडकता, खेळ, व्हिडिओ सादरीकरणे व वास्तवाधारित केस स्टडी यांच्या माध्यमातून सहजीवन, नातेसंबंधातील संवाद, गैरसमज,आवश्यक-अनावश्यक बाबी आणि संभाव्य आव्हाने यांचा प्रभावी उलगडा करण्यात आला.

 हा उपक्रम आजही समाजाला विचार करायला भाग पाडणारा ठरत आहे.‘विवेकी जोडीदार निवड’ आणि ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या दोन वाक्यांतील शब्दांची अदलाबदल अर्थ कसा बदलते, आणि नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारायचा हे प्रत्येकाने आपल्या समज, स्वभाव, कुटुंब आणि सामाजिक जाणीवांच्या आधारे ठरवावे, असा महत्त्वाचा संदेश या संवादशाळेतून देण्यात आला.

 विचारप्रवर्तक आणि समाजाभिमुख उपक्रमाची, समाजाला नितांत गरज असल्याचे उपस्थित नागरिकांनी मत व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्या कुटुंबात व नातेसंबंधांमध्ये विवेकी संवादाची सुरुवात करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली

ठाणे, मुंबईतील विविध भागांतून आलेले वेगवेगळ्या वयोगटांतील लग्नाळू तरुण-तरुणी, विवाहित जोडपी आणि पालक उपस्थित होते.

या उपक्रमासाठी घाटकोपर शाखेचे कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर, प्रधान सचिव प्रफुल रणदिवे, संदेश खळे, कैलास बद्रीके, निर्मला माने, संदेश बालगुडे, प्रियांका सावखांडे, अनंत जोशी, अरुण सातव, छाया धनवे तसेच इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

********

संबंधित पोस्ट

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत…