vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

धुळे प्रतिनिधी, महिलांमधील गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक मुलीने एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सायंकाळी जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील, अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. संजय मोरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या मोहिमेची राष्ट्रीयस्तरावर सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनानेही ही मोहीम स्वीकारत जागतिक महिला दिनानिमित्त तिची सुरुवात केली असून साधारणतः 90 दिवस ही मोहीम चालणार आहे.

 

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

पंढरपूर कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

६३९७८ विद्यार्थी इ.१२ वी तर ६८२२३ देणार इ.१० वी ची परीक्षा-परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त व्हाव्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta