vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ घेण्यात आली होती. ही ऑनलाईन परीक्षा ३ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन सत्रात पार पडली. परीक्षेसाठी एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते, त्यापैकी ३८५५९ परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.

परिषदेकडून हा निकाल १३ मार्च २०२६ रोजी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in वर जाहीर करण्यात आला. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाटीईटी अथवा सीटीईटी ही सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती पूर्वी १६ मार्च ते २१ मार्च २०२६ या कालावधीत https://mscepune.in/dtedola/KP२०२६Info.aspx या लिंकवर भरायची होती. मात्र, उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती २२ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा …कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन झाले लोकभवन

vishwatmaklokswamivarta

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष; ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने वेधले जगाचे लक्ष ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा ‘अशोक चक्र’ने सन्मान

vishwatmaklokswamivarta