vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

जालना, प्रतिनिधी :- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांतील दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील अशा 8 पात्र वारसांची शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग-4 पदावर निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.25 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संघर्षानंतर या कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला आहे.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील रिक्त पदावर या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शारदा मांदळे (पहारेकरी), संगिता रंजवे (शिपाई), रमा लाटे (पहारेकरी), साईनाथ कसारे (शिपाई), साईनाथ जाधव (सफाईगार), विशाल खरात (शिपाई), दिपक जाधव (शिपाई) आणि पंकज पाटोळे (शिपाई) या आठ जणांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमाविल्याचे दुःख बाजूला सारून शासकीय सेवेच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची नवी उमेद या वारसांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आली. तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे दिसून येत आहे

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते हे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय कामात सचोटीने योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चा समारोप

vishwatmaklokswamivarta

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta