vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

        सांगली, प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील माविमच्या महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत कच्छी जैन समाज सभागृह, राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे होणार आहे. सांगली शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांच्या वस्तूंची खरेदी करावी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, डाळी, कडधान्ये, सेंद्रिय फळे व भाजीपाला यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.

       या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे पाटील, नाबार्ड सांगलीचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ उपस्थित राहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे  सप्टेंबरचे मानधन वितरित

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल…

vishwatmaklokswamivarta