vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे

या परीक्षेत विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे

या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिला खुल्या प्रवर्गामधून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांचा सविस्तर निकाल तसेच प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट आहे.

वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येणार असल्याचेही आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

vishwatmaklokswamivarta

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील”कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहीम आज 1 मे पासून

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन;महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थांची गरज- ना. चंद्रशेखर बावनकुळे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे*राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भावपूर्ण समारोप.*दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार – अजित पवार**# संस्कृतीची वाहक असलेल्या भाषेची निगा राखणे सर्वांचे कर्तव्य – डॉ. भवाळकर*

vishwatmaklokswamivarta