vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

अहिल्यानगर, प्रतिनिधी- पारनेर येथील राज्य परिवहन महामंडळ आगार इमारत तसेच नवीन न्यायालय इमारतीच्या बांधकामांची राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता व वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 यावेळी आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगार बांधकामाची पाहणी करून प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात एस.टी. सेवेवर अवलंबून असल्याने आगार परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी स्वतंत्र विशेष कक्ष तसेच हिरकणी कक्ष उभारण्यात यावेत. प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. ऊर्जा बचतीच्या दृष्टीने आगारासाठी सौर ऊर्जेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी पारनेर व सुपा आगार बीओटी प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवासी सुविधा, बस स्थानक परिसर विकास, वाहतूक नियोजन तसेच भविष्यातील गरजांनुसार सुविधा उभारण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली.

त्यानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी पारनेर येथे सुरू असलेल्या नवीन न्यायालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बांधकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार-वनमंत्री गणेश नाईक

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या