vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड यांच्या अधिपत्याखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी जावळी, ता. माणगाव येथे कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या गरीब, हुशार, होतकरू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-२०११/प्र.क्र.२११/मावक-४ दि. २९ जून २०११ नुसार प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातींसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के तर अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

या निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत, निसर्गरम्य वातावरण, मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, मोफत गणवेश, भव्य क्रीडांगण, क्रीडा साहित्य, स्पर्धा परीक्षांची तयारी, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच डिजिटल क्लासरूमसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शाळेची प्रवेश प्रक्रिया दि. १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२२८७ तसेच शासकीय निवासी शाळा, जावळी येथील ९५११२२८६५४, ९८५०१७०७६२ किंवा ८६००८३८३८८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मागील इयत्तेचे गुणपत्रक, संचयी पुस्तिका, अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास), पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक व वैद्यकीय प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच अनुसूचित जाती व जमाती विद्यार्थ्यांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व अपंग घटकातील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कोकणवासियांना मोठा दिलासा- गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त तिकीट खिडक्या    खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर,प्रवासी संघटनेने मानले नरेश म्हस्के यांचे आभार  

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta