
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर;मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· दि 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मुंबई टेक वीक’ होणार· ओपन ए आय,मेटा, एंथ्रॉपिक आणि क्लाउडगुगल यांसारख्या जागतिक अग्रगण्य ए आय कंपन्यांचा सहभाग· दहा हजाराहून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींची उपस्थिती अपेक्षित..
मुंबई, प्रतिनिधी: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
Mमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केलीत्यावेळी ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम ) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. “इंडिया : आय इन एक्शन ” या थीमअंतर्गत आयोजित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा , एंथ्रॉपिक , ओपेनाई , गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असेल.यावेळी मुंबई टेक वीक लोगोचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन ए आय चा विविध विभागांमध्ये वापर करत आहे,AI च्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे.”मुंबई टेक वीकसारख्या व्यासपीठांमुळे AI संदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कार्यक्रमात शासनाच्या AI उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याची सूचनाही केली.टीम च्या वाढत्या विस्ताराचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्र शासन AI क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना AI क्षेत्रातील नव्या संधींशी जोडून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध असेल.



