vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

राज्य प्रतिनिधी-तुळजापुरात कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस-भाविकांचा ओघ वाढला; तुळजापूर-सोलापूर रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर-तुळजापूर-सोलापूर हा नेहमीचा ४५ कि.मी.चा रस्ता सर्वच वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी ४ | वाजल्यापासूनच प्रशासनाने बंद केला आहे.

दरम्यान, दोन पौर्णिमेच्या धर्तीवर तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. नवरात्र उत्सवात पाऊस, पूर होताच. आता कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा तरी उत्साहात व जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी सर्वजण मातेची प्रार्थना करत आहेत. लाखो श्रद्धाळू तुळजापूरवारी पूर्ण करण्यासाठी शेकडो मैल अंतर अनवाणी पार करीत तुळजापूरच्या वाटेवर आहेत.

गुरुवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली तुळजाभवानी मातेची पाच दिवसांची श्रम निद्रा मंगळवारी पहाटे (दि. ७) संपणार आहे. मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मूर्तीला पहाटे आणि सकाळी असे दोनवेळा पंचामृत अभिषेक होणार आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

vishwatmaklokswamivarta