vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे. आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते झाले.

या महोत्सवात गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या स्थानिक आंबा वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. कोयतूर, बीईओ, विशाखा स्थानिक, रसराज यासह विविध स्थानिक वाण प्रदर्शनात मांडण्यात आले. प्रदर्शनातून उत्कृष्ट वाणांची निवड करून त्यांचे संशोधन, संवर्धन व पुढील प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात आंबा लागवडीस मोठी संधी आहे. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंबा लागवडीला चालना द्यावी.

कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा प्रकल्प संचालक, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संशोधक, विषय विशेषज्ञ तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले पोलिस प्रशिक्षण सभागृह व सीसीटिव्ही कॅमेरे प्रकल्पाचे उदघाटन

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत  

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta