vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

*सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

सातारा प्रतिनिधी : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या १३९ तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ८७४ अशा एकूण १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेविशेष ग्रामसभेची सूचना देणे – ८ जून २०२६विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे – १२ जून २०२६ प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे – १९ जून २०२६ हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी – १९ जून ते २५ जून २०२६ हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ३ जुलै २०२६अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ८ जुलै २०२६अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे – १० जुलै २०२६तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्यासातारा तालुक्यात सर्वाधिक १४५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया होणार असून कराडमध्ये १३३, पाटणमध्ये १२०, खटावमध्ये ११० आणि फलटणमध्ये १०२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच कोरेगाव ७८, वाई ७६, खंडाळा ६१, माण ६१, जावली ७९ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठीही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा,मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत-समिती स्थापन करणार- मंत्री उदय सामंत