जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्य प्रतिनिधी-जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील काही भाग, ईशान्य राज्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि काही उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील भागांत पावसाचं प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं.
दरम्यान, उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक काळ टिकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.