vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले

मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण व जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सोलर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून कोणत्या झोनमध्ये किती जमीन येते, याची माहिती संकलित करावी. तसेच भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार मोबदला मिळाला आहे का, याची पडताळणी करून याचाही अहवाल शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत (एनजीओ) स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. या संस्था जळगाव जिल्ह्याबाहेरील असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यांना तातडीने प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित सोलर ऊर्जा कंपनीच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी. याबरोबरच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र तसेच अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

 

००००

संबंधित पोस्ट

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ UIDAI आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आधार संवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

दैनिक सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ! ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर