vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालअभावी प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य पंकज भुजबळ यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.

रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी नमूद केले.

00000

संबंधित पोस्ट

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- मंत्री जयकुमार रावल…

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश; ड्रोनच्या भव्य रोषणाईतून मानवंदना