राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..
राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..
राज्य प्रतिनिधी -राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं दिली आहे.
पालघर आणि नागपूर इथं प्रत्येकी दोन तसंच पुणें, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी एक पथक आणि मुंबईत एनडीआरएफची चार पथकं तैनात करण्यात आली आहे, तर धुळे आणि नागपूरात प्रत्येकी दोन आणि नांदेड आणि गडचिरोलीमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात आहेत.