vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

मुंबई, प्रतिनिधी : जिल्ह्यानिहाय पावसाच्या दुपारी ४ वाजेपर्यत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात ३१.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सर्वाधिक पाऊस ठाणे (१९६.९ मिमी) जिल्ह्यात नोंदवला गेला; त्यानंतर पालघर (१८५.४ मिमी), रायगड (१३४.१ मिमी), मुंबई उपनगर (१२५ मिमी), पुणे (६९.४ मिमी) आणि मुंबई शहर (६२.१ मिमी) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

१ जूनपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक एकूण पावसाची (१,४८०.७ मिमी) नोंद झाली आहे. त्यानंतर पालघर (१,२९५.४ मिमी), रत्नागिरी (१,२७३.४ मिमी), ठाणे (१,१०३ मिमी) आणि सिंधुदुर्ग (१,००१.४ मिमी) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे अनुक्रमे ५१०.७ मिमी आणि ५१२.७ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय असल्याचे दिसून येत असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण चांगले आहे. मुसळधार पावसामुळे, मान्सून महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे आशादायक चित्र आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण