vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

नवी मुंबई प्रतिनिधी:-पावसाचा जोर वाढल्याने कोकण विभागातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवार, ०८ जुलै २०२६ रोजीच्या प्रशासकीय आकडेवारीनुसार, कोकण विभागातील एकूण २७ नद्यांपैकी तब्बल ९ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून त्यापैकी काहींनी धोक्याची पातळीही पार केली आहे. यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

            ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथे उल्हास नदीने १७.५० मीटरची धोक्याची पातळी ओलांडून १७.७० मीटरची धोकादायक पातळी गाठली आहे. तसेच, जांभूळपाडा येथेही उल्हास नदी १४.८० मीटरवर वाहत असून तेथील धोक्याची पातळी १४.०० मीटर इतकी आहे. कल्याणमधील मोहने येथे उल्हास नदीची पातळी ९.९० मीटरवर पोहोचली असून तिने ९.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. टिटवाळा येथे काळू नदीने १०२.०० मीटरची इशारा पातळी पार केली असून सध्या ती १०२.३५ मीटरवर वाहत आहे.

       रायगड जिल्ह्यातही रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्या थेट धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर असताना आजची तिची पातळी २४.४० मीटरवर पोहोचली आहे. तर अंबा नदीने ९.०० मीटरची धोक्याची पातळी ओलांडत १०.३५ मीटरचा टप्पा गाठला आहे. महाडमध्ये सावित्री नदीनेही धोक्याची ६.५० मीटरची पातळी पार केली असून सध्या ती ७.६२ मीटरवरून वेगाने वाहत आहे. पनवेलमधील पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर असून ती आज २१.३० मीटरवर पोहोचली आहे.

 

            रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीने ५.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली असून तिची सध्याची पातळी ६.९० मीटरवर गेली आहे. ही पातळी ७.०० मीटरच्या धोक्याच्या रेषेच्या अगदी जवळ असल्याने खेडवासियांना सतर्क करण्यात आले आहे. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्या सुदैवाने अद्याप इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. कोकणातील या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

****

संबंधित पोस्ट

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta