vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत दिलेल्या प्राप्त माहितीनुसार मागील २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस झाला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे.      त्याखालोखाल ठाणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३७.२ मिमी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ३२.४ मिमी, रत्नागिरी३७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या समाधानकारक पावसामुळे मान्सूनची सक्रियता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल