vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 

मुंबई, प्रतिनिधी : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथ, ग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळे, उमेश भगत, उपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवी, कार्यकारी अभियंता दिनेश पाटील, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोर, सहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

000000

संबंधित पोस्ट

राज्यात  लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर ‘वॉच’….

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी फडकणार तिरंगा

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाने मराठा आरक्षण प्रश्नावर कोणतीही काळजी करू नये. हे सरकार मतासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम करत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अशी घोषणा मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

vishwatmaklokswamivarta