vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

सातारा प्रतिनिधी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील पालखी मार्गवरीलदारूची दुकाने दि.15 ते दि.19 जुलै, 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार पालखीच्या मार्गक्रमणानुसार खालीलप्रमाणे कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आले आहेत.

 

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थावन, मार्गक्रमण व मुक्कामाच्या ठिकाणी व मुक्कामाच्या दिवशी सर्व प्रकारची दारूची दुकाने, देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-3), विदेशी मद्यविक्री (एफएल-3) परवानाकक्ष (एफएल-3) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकाने (टिडी-पुढील तारखांना विविध ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 15 जुलै रोजी पाडेगाव, बाळ पाटलांची वाडी, लोणंद शहर. दि.16 जुलै रोजी लोणंद शहर व परिसर (तसेच तरडगावला पालखी पोहोचेपर्यंत लोणंद बंद राहील). दि. 17 जुलै रोजी तरडगाव ते फलटण रस्त्यावरील व फलटण शहर व परिसर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल., दि.18 जुलै रोजी फलटण ते बरड रस्त्यावरील व बरड, विडणी, पिंपरद, निंभळक फाटा., दि. 19 जुलै रोजी साधुबुवाचा ओढा, धर्मपूरी, बरड व राजुरी पानसकरवाडी (पालखी पुढे सोलापूर जिल्ह्यात जाईपर्यंत बंद). या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध (परवानाधारक) मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच दुकान बंद ठेवण्यात आलेल्या कालावधीसाठी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000

संबंधित पोस्ट

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा…

vishwatmaklokswamivarta

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती संकलित होणार