vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

जालना, प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753H वरील कुंडलिका नदी येथे प्रमुख पुलाचे बांधकाम वेगाने सुरू असून या कामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरता पर्यायी (डायव्हर्जन) मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी सुरक्षित असल्याने 27 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 किंवा पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे अगोदर होईल) जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जालना यांच्या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 115 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

प्रशासनाने यापूर्वीही जड वाहनांना पर्यायी बायपास मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही जड वाहने अद्यापही तात्पुरत्या मार्गावरून जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. तसेच पुलाच्या बांधकामात अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी प्रवेशबंदीचे फलक, बॅरिकेड्स आणि इतर वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने जड व अवजड वाहनांसाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.

पर्यायी मार्ग :

जालनाकडून मंठा चौफुलीकडे जाणारी जड वाहतूक : अंबड चौफुली – कालिका स्टील चौफुली – कन्हैया नगर चौफुली – मंठा चौफुली.

मंठ्याकडून जालन्याकडे (अंबड चौफुलीकडे) जाणारी जड वाहतूक : मंठा चौफुली – कन्हैया नगर चौफुली – कालिका स्टील चौफुली – अंबड चौफुली.

जिल्हा प्रशासनाने सर्व जड व अवजड वाहनचालकांनी निर्धारित पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 139 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवडअरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य; 10 मार्चपर्यंत अर्जाची मुदत..

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक