
कोकण विभागात पावसाचा जोर कायम: सरासरीच्या ६४.८२ टक्के पर्जन्यमानाची नोंद…
नवी मुंबई, प्रतिनिधी:- कोकण विभागात आतापर्यंत विभागाच्या वार्षिक सरासरीच्या तब्बल ६४.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महावेध संकेतस्थळावरून २७ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोकण विभागात आतापर्यंत एकूण १७१५.८१ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत (२७ जुलै २०२५ पर्यंत) विभागात १३२९.०६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा कोकणात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे.
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २०१२.८० मि.मी. (६०.९३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सर्वाधिक ७९.१० टक्के (१८९५.९० मि.मी.) पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यात ६९.१० टक्के (१६६९.१० मि.मी.) आणि पालघर जिल्ह्यात ७४.२१ टक्के (१७९२.५० मि.मी.) पर्जन्यमान झाले आहे. मुंबई शहरात वार्षिक सरासरीच्या ७४.५५ टक्के म्हणजेच १६००.०० मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
दक्षिण कोकणात मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५२.३१ टक्के (१७५९.९० मि.मी.) पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३.५५ टक्के म्हणजेच १२८०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
***



