vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ पत्राने खळबळ! पवारांच्या घराबरोबर ८ ठिकाणांना दिला गेला होता इशारा….

मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ पत्राने खळबळ! पवारांच्या घराबरोबर ८ ठिकाणांना दिला गेला होता इशारा….

 

मुंबई प्रतिनिधी

शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर मुंबई पोलिसांच्या सतर्कतेचा मुद्दा समोर आला होता. मात्र, पोलिसांनी आधीच याबद्दल सतर्क केले होते, तसे पत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलं गेलं होतं…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांच्या यंत्रणेबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पोलिसांनी अगोदरच यासंदर्भातील इशारा दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. यात आठ ठिकाणी आंदोलन होईल असं म्हटलेलं आहे.

८ एप्रिल रोजी शरद पवारांच्या घराबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी पोलिसांना याची माहिती का नव्हती असे प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

दरम्यान, या प्रकरणात अनेक घडामोडी घडत असताना एक पत्र समोर आलं आहे. हे पत्र मुंबई पोलिसांचं असून, मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सह पोलीस आयुक्तांना देण्यात आलेलं होतं. या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन अधिक आक्रमक केलं जाणार असल्याचा इशारा दिलेला आहे.

महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या घरासह मुंबईतील आठ ठिकाणी आक्रमक स्वरूपाची आंदोलनं केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगत गुन्हे अन्वेषन विभागाने संबंधित ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्याचा इशारा दिलेला होता

उच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख ५ एप्रिल २०२२ रोजी आहे. त्यानुषंगाने आझाद मैदानात १,५०० ते १,६०० पुरुष व महिला आंदोलक येत-जात आहेत. आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनीकरणाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध लागण्याची जाणीव कर्मचाऱ्यांना झालेली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी मंत्रालयात ५ एप्रिल रोजी २०२२ रोजी सिल्व्हर ओक, मातोश्री बंगला, याठिकाणी आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे पत्रात म्हटले होते अशी बातमी मुंबईत वरही आलेली आहे

आंदोलक त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलक आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री बंगला, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह, सार्वजनिक परिवहन मंत्री यांचं शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील खासगी निवासस्थान, उच्च न्यायालय, सिल्व्हर ओक या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आह.

त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य तो बंदोबस्त लावणे उचित होईल, असं गुन्हे अन्वेषन विभागाचे अपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

संबंधित पोस्ट

Google Doodle Nowruz 2022: पारसी नववर्ष नवरोज निमित्त गूगल डूडल बनवत सर्च इंजिनकडून हटके शुभेच्छा

राष्ट्र प्रथम, करोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन , कारगिल विजय दिवस आणि ओलंपिक वर संबोधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन विज्ञान निष्ठा जपा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी..

vishwatmaklokswamivarta

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा