vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मुंबईत 8000 कोटी रुपयांचे प्रकल्प विकसित करणार L&T Realty; निवासी संकुलासह उभे राहणार आधुनिक ‘शॉपिंग’ कॉम्प्लेक्स, जाणून घ्या ठिकाणे

मुंबईत 8000 कोटी रुपयांचे प्रकल्प विकसित करणार L&T Realty; निवासी संकुलासह उभे राहणार आधुनिक ‘शॉपिंग’ कॉम्प्लेक्स, जाणून घ्या ठिकाणे…

 

व्यवसायिक प्रतिनिधी

लार्सन अँड टुब्रोची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट शाखा एल अँड टी रिअॅल्टी (L&T Realty) मुंबई (Mumbai) प्रदेशात संयुक्तपणे 8,000 कोटी रुपयांचे प्रकल्प विकसित करणार आहे. यासाठी कंपनीने करार केला आहे. ‘कंपनीने दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरी भाग अंधेरी आणि ठाणे येथे 8,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी निश्चित करार केला आहे, असे एल अँड टी रिअॅल्टीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. मात्र, ज्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत त्यांची नावे दिलेली नाहीत.

एल अँड टी रिअॅल्टीने सांगितले की, महानगरांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या कंपनीच्या योजनेचा हा एक भाग आहे. पुढील पाच वर्षांत 5 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र जोडण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत जोशी म्हणाले, ‘आम्ही आमची पोहोच वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि यासाठी सतत नवीन बाजारपेठाकडे पाहत आहोत.’

निवेदनानुसार कंपनी दक्षिण मुंबईतील पाच एकर जागेवर निवासी प्रकल्प विकसित करणार आहे. दुसरा प्रकल्प पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे आहे, ज्या ठिकाणी कंपनी निवासी संकुल आणि आधुनिक ‘शॉपिंग’ संकुल उभारणार आहे. ठाण्यातील प्रकल्पात कंपनी सहा एकर जागेवर निवासी प्रकल्प विकसित करणार आहे

संबंधित पोस्ट

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रशिक्षण योजना

हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव प्राप्त करुन देणार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी शिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल

सिपेटमध्ये बेरोजगार युवक, युवतींसाठी निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार

हातमाग, वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 10 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन