
सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती, उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय….
सोलापूर प्रतिनिधी
चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे.
आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असुन उध्दव ठाकरे गटाने खाते उघडले आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे. तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हार मानावी लागली आहे.



