
आज टी२० चषकातील भारतासाठी सर्वाधिक महत्वाचा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच..
क्रिकेट प्रतिनिधी
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका मालिका पार पडली. त्यानंतर आता या दोन्ही संघाने टी २० विश्वचषकात वर्णी लावत विविध संघाविरुध्द उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताने यापूर्वी नेदरलॅंड आणि पाकिस्तान विरुध्द दणदणीत विजय मिळवला असला तरी आजची लढत भारताचा टी२० चषकातील पुढील प्रवास ठरवणारी आहे. पराभव दोन्ही बाजूंसाठी अंतिम ठरणार नसला तरी, उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी विजय महत्वाचा आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत.
टी२० विश्वचषकातील आतापर्यंत पाऊस किंवा पराभवाचा अनुभव न घेतलेला भारत हा एकमेव संघ आहे. विराट कोहलीने दिलेला एक तणावपूर्ण विजय,टॉप इलेव्हनमधील (Top 11) विविध ठिकाणांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि भारतीय गोलंदाजांचा परफॉर्मस हे टीम इंडियाचे वैशिष्ट्य आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याबाबतची उत्सुकता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघास लागली आहे



