vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली

 

नाशिक गुन्हे प्रतिनिधी

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन मुले आणि वडिलांचा समावेश आहे. या तिघांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास  घेऊन जीवन संपवलं. तिघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. घटनेची माहिती  मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

घटना रविवारी (दि.29) दुपारी तीन ते साडीतीन च्या दरम्यान घडली. दीपक शिरोडे (वय-55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय-25), लहान मुलगा राकेश शिरोडे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. या तिघांनी घरातील वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. (Nashik Crime)

दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉपजवळ फळ विक्री व्यवसाय करतात.
दरम्यान, पत्नी आणि आई या दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
त्या घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मात्र, आत्महत्येमागचे नेमकं कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करीत आहेत.

संबंधित पोस्ट

छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

vishwatmaklokswamivarta

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर अटॅक पासून जनतेचे करणार रक्षण-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडचा करणार सामना

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्य निमित्त विविध कार्यक्रमांतर्गत देशभरात साजरा करण्याची तयारी भाजपकडून सुरू… हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे.

vishwatmaklokswamivarta