vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, शंभरहून अधिक चित्रपटात काम केले …

अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन, शंभरहून अधिक चित्रपटात काम केले …

 

सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते जावेद खान अमरोही यांना श्रध्दांजली अर्पण करत आहेत. जावेद खान अमरोही यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

बॉलीवूड प्रतिनिधी

टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड अशा दीर्घ पल्ल्यावर अभिनयाच्या माध्यमातून आपली छाप उमटवणारे अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाले आहे. जावेद खान यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘लगान’ (Lagaan) चित्रपटात साकारलेल्या राम सिंह या त्यांच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते

सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते जावेद खान अमरोही यांना श्रध्दांजली अर्पण करत आहेत. जावेद खान अमरोही यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जावेद खान अमरोही यांचे ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे इंडिया’, ‘लगान’ हे काही गाजलेले अलिकडील काळातील चित्रपट. या चित्रपटांतील भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जातात. याशिवाय जावेद खान अमरोही यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनयाचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. ‘लगान’ चित्रपटाचा अभिनेता अखिलेंद्र मिश्रा याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून मुंबईत जन्मलेल्या जावेद खान अमरोही यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांचा फोटो शेअर करत लिहिले, ‘जावेद खान साहेबांना विनम्र श्रद्धांजली. सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्येष्ठ चित्रकार, EPTA चे सक्रिय सदस्य

जावेद खान अमरोही यांनी 1973 साली ‘जलते बदन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ‘नूरी’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘बाजार’, ‘रंग बिरंगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय कौशल्य दाखवले. जावेद खान अमरोही यांनी ‘मिर्झा गालिब’ या मालिकेसह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

 

संबंधित पोस्ट

मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मुंबई तील धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात

vishwatmaklokswamivarta

मुंबई – पुणे प्रवास महागला, इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ

vishwatmaklokswamivarta

आंबेडकर आणि मार्क्स : समाज परिवर्तनाच्या दिशा” या विषयावर संवाद सभा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी ‘सक्षम ॲप’वर नोंदवावी-मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.