vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना धक्का, तर एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय…

 राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना धक्का, तर एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राज्यातील सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना झटका तर पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शिवसेनेतील सत्ताकारणावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी मोठा आदेश दिला. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर दोन्ही गट शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण या मूळ निवडणूक चिन्हावर दावा करत होते.

प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले होते. पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना दोन वेगवेगळी चिन्हे देण्यात आली. त्यात शिंदे गटाला दोन तलवारी आणि ढाल तर उद्धव गटाला मशालचे चिन्ह देण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या दरबारात जाऊ आणि मग नवी शिवसेना स्थापन करू. ही लोकशाहीची हत्या आहे. कायद्याची लढाईही आम्ही लढणार आहोत.

 

 

संबंधित पोस्ट

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

हिंदू समाजाच्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा भव्य विराट मूक मोर्चा.. ..

vishwatmaklokswamivarta

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

ठळक बातम्या, एसटी संपाबाबत विधान भवनात बैठक सुरू…

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” साठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

vishwatmaklokswamivarta

कोल्हापुरातील पन्हाळगडावर रोज अडीचशे  छात्र  सैनिक जय शिवाजी, जय भवानी’ शिव घोषात दाखल…

vishwatmaklokswamivarta