vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तिबेटीयन जनतेला न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे,आंतरराष्ट्रीय राष्ट्रांचा हवाय पाठिंबा..

 तिबेटीयन जनतेला न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे,आंतरराष्ट्रीय राष्ट्रांचा हवाय पाठिंबा..

 

[ सुरेश गायकवाड याच कडून

मुंबई प्रतिनिधी: मुंबई- चीन देशाच्या दहशतीखाली तिबेटीयीन जनता क्षणोक्षणी मरण यातना भोगते आहे. त्यांचे जीवन नरकयातना अनुभवतोय अशी भयावह स्थिती असताना न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रांनी पाठिंबा दयावा यासाठी तिबेटीयन प्रतिनिधीनी आयोजित केलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

[: तिबेट हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. हया भागावर चीनने अतिक्रमण करून येथील जनतेला मरण यातना भोगावयास लावल्या आहेत. त्यामुळे येथील १५७ जणांनी आत्मदहन केले आहे. तसेच येथील जनता अत्यंत मरणासम आयुष्य जगते आहे. त्यांना जोखडाखाली ठेवण्यासाठी जागोजागी १०० हून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांना पुरते गुलाम करून ठेवले आहे. ते अत्यंत क्षुद्रपणाचे आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले.

 तिबेटयीन जनतेचा आवाज सर्व राष्ट्रांना कळण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन चीनच्या दहशतीला चाप लावावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

[ तिबेटीयन जनतेच्या न्याय हक्कांसाठी मंत्रीमहोदय दिलीप वळसे पाटील, अजीत पवार,देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही भेट घेणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हें तर सिद्धार्थ कॉलेज च्या विद्यार्थ्यांशी, एनजीओच्या पदाधिकाऱ्याशी भेटून चची केली असल्याचे ही त्यांनी सांगितले.

: या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये तिबेटियन जनतेचे दुःख जगाला कळावे आणि त्यांना वाचविण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा त्यासाठी उपस्थित असलेले खासदार अनद्रूक तत्सेन , तेसरींग यांगचेन, धोन्डप ताशी सोबत अनुवाद जिग्मे यांनी केले.

संबंधित पोस्ट

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

vishwatmaklokswamivarta

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड…

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी,  पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta