vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मस्थानिक बातम्या

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

मुंबई प्रतिनिधी-

गेल्या अनेक वर्षापासून धारावीतून निघणाऱ्या ज्योतिबा भगवंताच्या यात्रेला खंड पडला होता ती यात्रा आता पूर्वत सुरू झाली आहे आज पोर्णिमा हनुमान जयंती याच्या शुभ मुहूर्तावर ज्योतिबाच्या नावानं चांगभलं नावाचा जयघोष करत यात्रा संपन्न होणार आहे

“जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा पुन्हा नव्याने समस्त  समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने आज दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

१५० वर्षांची परंपरा मागील ८ वर्षांपासून खंडित झाली होती ती यावर्षी पुन्हा नव्याने समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

ठिकाण :- “श्री.जोतिबा मंदिर” शिवनारायण बावडी, धारावी मेन रोड, बगीचा, सकिनाबाई चाळ,संत रोहिदास मार्ग कोळी वाडा, मुकुंद नगर ते काळा किल्ला पूर्वी प्रमाणे मार्ग असणार आहे, परत येते वेळीं संत कक्कया मार्ग ते श्री.जोतिबा मंदिर असा मिरवणूक सोहळा होणार आहे.

“आपली संस्कृती, आपला अभिमान”

प्रति कोल्हापूर यात्रा सोहळा फक्त धारावीतच होत असतो.

(अनेक राजकीय, सामाजिक संघटना आणि पत्रकार यांचे मनःपूर्वक आभार सर्वांनी सहकार्य करून ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे).आयुष्याच चांगभलं होण्यासाठी, गुलाल, खोबरे आणि दवणा श्री.जोतिबा देवाला अर्पण करून सुखी,समाधानी आणि निरोगी आयुष्य जगुया. !! नाही मोठं मागणं नाही मोठी हाव रं बापा सारखी माया तू लेकराला दे !! “जोतिबाच्या नावांन”चांगभलं चांगभलं चांगभलं…..

00000000

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात,नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

vishwatmaklokswamivarta

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जयकिसन शिंदे ठरले ‘कृषिभूषण’, सोमीनाथअवघड यांना ‘युवा शेतकरी पुरस्कार’; जालना जिल्ह्याचा मुंबईत दणदणीत गौरव