
.*🌹ओम नमः शिवाय🌹* *🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹**आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही,*
*आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यांत येते की जे बाहेर शोधत होतों ते तर माझ्याच जवळ होते…*
*सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो.. पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करु शकत नाही… म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे..!*
_*प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते.*_
_*प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत… एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.*_
*देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो…*
*त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो…*
*आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते…*
*तो सर्वांना दिसत असतो…*
*म्हणुन मंदीरातला देव एकवेळ टाळला तरी चालेल…*
*पण कर्मातला देव कधीही टाळु नका…!*
*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची*
*माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे*
*आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.*
*लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून*
*काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य*
*पायाला झालेली जखम,*
*जपून चालायला शिकवते,*
*आणि मनाला झालेली जखम,*
*आयुष्य जगायला शिकवते.*
*आयुष्यात आनंदी राहायचं असेल,*
*तर कोणालाही गरजेपेक्षा,*
*जास्त महत्त्व देऊ नका.*
*कारण…*
*तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता,*
*पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते.*
*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर💐*
आज दिनांक १० फेब्रुवारी २०२४ शनिवार
*दिवस तुमचा आनंदात जावो हीच शनिदेव व बजरंग बली च्याचरणी प्रार्थना ..💐💐*



