vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय, तात्पुरत्या काळासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद..

मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय, तात्पुरत्या काळासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर  झालेल्या मोठ्या गर्दी मुळे चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने  मोठा निर्णय तात्काळ प्रभावाने प्लॅटफॉर्मची बंद करण्यात आली आहे  वांद्रे टर्मिनस स्थानकावर  झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती अशी-वांद्रे टर्मिनस स्थानकावर  झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला,,मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी 8 नोव्हेंबरपर्यंत तत्काळ लागू असेल.

वांद्रे टर्मिनस स्थानकावर चेंगराचेंगरी -मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री उशिरा 2 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोरखपूरला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली, त्यात सुमारे 10 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

दरवर्षी दिवाळी आणि छठ दरम्यान भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. सण साजरा करण्यासाठी देशातील विविध शहरांतील लोक यूपी-बिहारमध्ये जातात. दरम्यान, मोठी गर्दी झाल्याने हा अपघात झाला. वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेने वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस या साप्ताहिक गाडीचे वेळापत्रक अपडेट केले होते. ही गाडी पहाटे 5.10 वाजता धावणार होती. री-शेड्युल केल्यानंतर सकाळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उशिरा आली,दरम्यान स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने सर्वसाधारण बोगीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. यात काही प्रवाशांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत, तर काहींना कंबर आणि हाता-पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

लोकजनशक्ती पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रवीभाऊ गरुड यांची नियुक्ती, सर्व थरातून अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव.

vishwatmaklokswamivarta

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

ठाणे जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधीसंकलन शुभारंभ 10 डिसेंबर रोजी होणार

vishwatmaklokswamivarta

दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

vishwatmaklokswamivarta