vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत यासंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी पाहणी करावी व तसा अहवाल दरमहा सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक प्र.वि. सुरसे, उपसंचालक धिऱा. खिरोडकर, सहा. संचालक श्रीमती गायकवाड, ग.बा. पाचवणे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत राऊत यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र कारखाने नियम व महाराष्ट्र कारखाने नियम २००३ अन्वये कारखान्यांचे कामकाज व कामगारांची सुरक्षा याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आवश्यक तपासण्या व कारवाई बाबत माहिती देण्यात आली. धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असून कामगार व औद्योगिक सुरक्षा अधिनियमानुसार ते बंधनकारकही आहे. याबाबत कामगारांमध्ये तसेच आस्थापना चालकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवावे. कामगारांना आपल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी प्रशिक्षित करावे. याबाबत प्रत्येक आस्थापनेत होत असलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी एका समितीचे गठन करावे व त्या समितीने आपला अहवाल दरमहा सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले

संबंधित पोस्ट

यमाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून..