vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 173/95/120 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी तीन तालुक्यात विविध पाईपलाईनची काम पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या पाईपलाईनद्वारे परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 268 गावांना जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी विविध विभागामार्फत कामे करतांनी पाईपलाईनची तुट-फुट होवून या गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागते तसेच ग्रामस्थांच्या रोषाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सामोरे जावे लागते. तरी तीन तालुक्यात कोठेही काम करावयाचे असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना यांना पुर्व सुचना देण्यात यावी. जेणेकरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी प्रत्यक्षस्थळी उपस्थित राहून पाईपलाईनची अलायमेंट दाखवून देईन आणि पाईपलाईनची नासधूस होणार नाही व काम सुकर होतील. असे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय!केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी…

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप,  इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त