vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे येथील राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 पुणे येथील*राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – पुणे येथील राजगुरुनगर मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर नराधमाने अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. अत्याचारात बळी गेलेल्या मुली या सख्ख्या बहिणी होत्या.पीडित मुलींच्या शोकाकुल कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी पीडित मुलींच्या आई वडिलांना धीर दीला.राज्य सरकार तर्फे सांत्वनपर 10 लाखांचा निधी जाहीर झाला असून तो पीडित कुटुंबीयांना त्वरित मिळवून देण्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.रिपब्लिकन पक्षा तर्फे सांत्वनपर निधी देण्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

8 आणि 9 वर्षांच्या अजाण मुलींवर अत्याचार करणाऱ्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. नराधम आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक करून पोलिसांनी चांगली कामगिरी केली.

 यावेळी भटक्या विमुक्त समाजाच्या शिष्टमंडळाने ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन भटक्या विमुक्त समाजाला सुद्धा एट्रोसिटी ॲक्ट चे संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

स्मार्ट’ अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प कालबद्धरितीने पूर्ण करावेत- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान,लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस