vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

 

मुंबई, प्रतिनिधी- कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.

२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.000

संबंधित पोस्ट

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

vishwatmaklokswamivarta

मुंबईसाठी यलो अलर्ट, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस;  हवामान खात्याचा अंदाज…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्तांची पत्रपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर,विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर

13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले.

यूपीएससी परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कौतुक