vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

 

 राज्य प्रतिनिधी-

कल्याणच्या काटेमनोली नाका येथील नाना पावशे चौकात बुधवारी मध्यरात्री साधारण 12:30 वाजता गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात रंजीत दुबे नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली. आरोपी रामसागर दुबे हा मृतकाचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे.

जमिनीच्या वादातून हत्या,पोलीस तपासानुसार, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. त्याच कारणावरून रामसागरने रंजीतवर आधी गोळी झाडली आणि नंतर चाकूने वार करत त्याची हत्या केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई केली,

घटनास्थळावरून पोलीस तातडीने सक्रिय झाले आणि काही वेळेतच आरोपी रामसागरला अटक करण्यात आली. मृतकाच्या बहिणी पूनम तिवारीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्या आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

रंजीत दुबेचा गुन्हेगारी इतिहास।सूत्रांच्या माहितीनुसार, रंजीत दुबे हा रवि पुजारी टोळीचा शूटर होता. यापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचनं एका बिल्डरवर गोळीबार केल्याच्या प्रकरणात त्याला अटक केली होती.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण।

या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती की वादातून अचानक घडली, याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित पोस्ट

सीबीआयने सहार एअर कार्गो, मुंबई येथील सीमाशुल्क अधीक्षकाला 10.20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली

न्यू इयरला लोणावळ्यात हिल स्टेशनवर जाण्याचा प्लान करत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी

vishwatmaklokswamivarta

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

अस्तित्व संस्था-ठाणे यांनी महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ हे दोन अंकी नाटक

vishwatmaklokswamivarta