vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी – रासायनिक खतांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.देशात कॅन्सर सारखा रोग वाढताना दिसत आहे.ते रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे.आरोग्य आणि निसर्ग यांच्या हिता साठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केल ,सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते.प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी भागलपूर येथुन दृकश्राव्य माध्यमातून7 उपस्थित होते. विचारमंचावर शाबरी कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक गायकवाड; प्रमुख कृषी शास्त्रज्ञ लालासाहेब तांबट; डॉ.राजेंद्र मराठे; शुक्राचार्य भोसले; रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी

शेतकरी सन्मान निधी चे देशभरातील 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी जमा करण्यात आले.मागील 2019 पासून ही शेतकरी सन्मान निधी योजना सुरू असून आता पर्यंत अव्याहतपणे सर्व हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारे 6 हजार रुपये ही शेतकऱ्यांसाठी मौलिक मदत ठरत आहे.या पीएम शेतकरी सन्मान निधीचा महिला शेतकरी ही मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणारआज नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

vishwatmaklokswamivarta