vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन.. 

माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन..

        सांगली, प्रतिनिधी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील हे एक विद्यापीठ होते. त्यांचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  येथे केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्य मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, शैलजा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी, पाटील कुटुंबिय आदि उपस्थित होते.

   माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारक म्हणून योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय भूमिकेत आल्यानंतरही त्यांनी आपली तत्वे, मूल्ये जपली. ते सर्वसामान्य माणसाला आपले करणारे नेतृत्व होते. वर्षानुवर्षे ज्यांच्या स्मृती पुसल्या गेल्या नाहीत, असे वसंतरावदादा यांचे नेतृत्व होते. शिक्षणासाठी दक्षिणेला जाणारा ओढा त्यांनी विनाअनुदानित महाविद्यालये सुरू केल्याने थांबला. आजही राजकारणात त्यांचे अनेक दाखले दिले जातात, असे त्यांनी सांगितले.

 प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 24 जुलै रोजी नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ करणार जाहीर नवे सहकार धोरण आगामी दोन दशकांसाठी भारताच्या सहकार चळवळीत ठरणार महत्वाचा टप्पा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !वर्ष ७११ पासून सुरु असलेल्या जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती