vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..

 

 सांगली, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय लावणी महोत्सव २०२५ मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे सुरू झाला. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक संदीप बलखंडे, माजी कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लावणी महोत्सव मिरज येथे दिनांक 1 ते 3 मार्च 2025 या कालावधीत बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यातील विविध लावणी कलापथक आपली कला सादर करणार आहेत.

स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक सुरेश आवटी यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हा लावणी महोत्सव प्रेक्षकासाठी विनामूल्य असून याचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूतीभारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन..

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति-आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन