vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

            सांगली, प्रतिनिधी : मिरज तालुकास्तरीय संजय गांधी योजना समितीच्या दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी बैठकीमध्ये श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 442, संजय गांधी निराधार योजना मिरज ग्रामीण 470, संजय गांधी निराधार योजना मिरज शहर 193 असे एकूण 1 हजार 105 नव्या लाभार्थींना नव्याने योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी मिरज तालुक्यातील पात्र लाभार्थींनी गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत, जेणेकरुन तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात पारदर्शक, गतिमान लोकभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत सुकर जीवनमान या घटकामध्ये नागरी सेवांचे सुलभीकरण करण्याच्या अनुषंगाने मिरज तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अभियान कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत गावामध्ये ज्या पात्र नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा लाभार्थी यांची शोध मोहीम राबविण्यात आली. संबंधितांचे अर्ज प्राप्त करुन स्थानिक चौकशी करण्याची कार्यवाही विशेष शिबीर राबवून पूर्ण करण्यात आली. त्याअंतर्गत तालुकास्तरीय समिती मार्फत दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी संजय गांधी योजना समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

vishwatmaklokswamivarta

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..